Wednesday, February 27, 2013

तोच चंद्रमा

१. सारे जरि ते तसेच धुंदी आज ती कुठे?
    मीहि तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे?
    ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
    एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!

२. जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
     अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
     जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्याला
     माझ्या मनातला का तेथे असेल रावा?

३. काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
    मज फुलही रुतावे हा दैवयोग आहे!

४. मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
     घर पान्यामंदी बंदराला करतो ये जा!


कवयित्री: शांता शेळके
पुस्तक: तोच चंद्रमा



Sunday, February 24, 2013

व्यक्ती आणि वल्ली

१. मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांचे 'भय्या' आणि 'मद्राशी' असे दोन स्थल विभाग मी करू शकतो. विभाग जरा स्थूल वाटला तर 'वानियाभय' असेल असा अंदाज. ह्या वानियाभायामध्ये मारवाड, गुजरात, बंगाल सारे येतात. 'शीख' ओळखता येतो; पण कालचा शीख आज ओळखता येत नाही."
२. "अहो कसला गांधी? जगभर गेला; पण रत्नांग्रीस फारसा आला नाही. पक्का तो! त्यास नेमकं ठाऊक इथं त्याच्या पंच्याच कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवाले नि त्याच्यापेक्षाही उघडे! शुताबितात तथ्य नाही हो! आमचा शंभूभट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला. ब्रिटीश सरकार सोडा पण रत्नांग्रीचा गिलिगन कलेक्टरदेखील कधी घाबरला नाही! तिसरं शस्त्र म्हणजे उपासाचं! इथे निम्मं कोकण उपाशी! नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक, आम्हास कसलं"?






लेखक: पु. ल. देशपांडे
पुस्तक: व्यक्ती आणि वल्ली













Thursday, February 7, 2013

विधवा कुमारी

१. खोटं म्हणजे काय?
    जे माणसाला सुचतं, पण देवाला रुचत नाही ते खोटं.




लेखक:  मामा वरेरकर.
पुस्तक: विधवा कुमारी.









Video