Friday, April 5, 2013

दोन मने

१. मनुष्य दैवाच्या हातचे बाहुले नसला तरी नशीब हेही काही माणसाच्या मांडीखालचे घोडे नव्हे.

२. घरसुद्धा पुरते न उजळणारी पणती होण्यात काय अर्थ आहे? क्षणभर का होईना, ब्रम्हांड उजळून टाकणाऱ्या विजेप्रमाणे चमकून जावे.

३. रोग लपविला, योग्य वेळी औषध घेतले नाही म्हणजे शेवटी शस्त्रक्रियेची पाळी येते. शरीराच्या बाबतीतच माणसावर हि पाळी येते असे नाही, मनावरही ती येते.







लेखक: वि. स. खांडेकर.
पुस्तक: दोन मने




No comments:

Post a Comment

Video